शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा




गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणाही विधासभेत करण्यात आली.



नागपूर, 21 डिसेंबर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणाही विधासभेत करण्यात आली. 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल. तर 30 सप्टेंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीला महात्मा फुले कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली, ती परिपूर्ण नाही. सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. तो पाळलेला नाही, असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारी पक्षांनी मात्र या योजनेचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा दावा आहे.


उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे


- 'प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करणार'


- पूर्व विदर्भात स्टील फॅक्ट्री उभारणार


- सिंचनाचा एकही प्रकल्प स्थगित केला नाही


- 'कुठल्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही'


- सिंचनाचा कोणाताही अनुशेष बाकी ठेवणार नाही


- समृद्धी महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार


- समृद्धी महामार्गाची जबाबदारी आता आमची


- 'शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार'


- रस्त्यांच्या सुधारणेसाठी गतीशील चालणा देणार


- विदर्भात आरोग्यसेवेत सुधारणा करावी लागणार


- पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे मागणी केलीये


- गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन


- 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार



Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image